मुंबई आणि ठाण्यात १४४ कलम लागू

25 Jun 2022 18:34:37
मुंबई : शहरातील कायदा व व्यवस्था अबाधित राहावी यासाठी आजपासून 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी केलं आहे. सद्य परिस्थतीत निर्माण झालेल्या राजकीय पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि ठाण्यात १४४ कलम लागू करण्यात आलेले आहे.
 
 
maha
 
 
मुंबई पोलीस आयुक्त तसंच कायदा व सुव्यवस्थेचे उपायुक्त आणि पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीअंती शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी म्हणून 10 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Powered By Sangraha 9.0