जगभरातील हिंदूंनी भारताला आपले घर मानावे : चेतन भगत

11 Dec 2019 11:18:33
नवी दिल्ली: केंद्रीय सरकारने सोमवारी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सादर केले. आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली. विधेयक मंजूर झाल्यानंतर लेखक चेतन भगत यांनी केलेला ट्विट चर्चेचा विषय ठरला आहे.

l_1  H x W: 0 x 
 
चेतन भगत यांनी मंगळवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, जगात कोठेही हिंदूंना आपल्या धर्मासाठी दडपशाही सहन करावी लागली, तर त्यांनी भारताला आपले घर मानावे. भारत या महान धर्माचे घर आहे आणि ते नेहमीच त्याचे संरक्षण करेल. चेतनच्या या ट्विटचे काही नेटकऱ्यांनी समर्थन केले तर काहींनी त्याच्यावर टीका केली.
Powered By Sangraha 9.0