भाजपच्या संगतीमुळे शिवसेना बिघडली - नवाब मलिक

26 Nov 2019 18:31:52
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधत राज्यातून भाजपाचा अंत होण्यास सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादन केले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजपाचे पितळ उघडे पडले आहे. शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या हितासाठी झाला होता. मात्र, शिवसेना भाजपासोबत गेल्यामुळे बिघडली होती, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
 


 
 
भाजपाने घोडेबाजार करण्याचा खेळखंडोबा केला. मणिपूर, गोवा, कर्नाटकात झाले ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही. भाजपा बहुमत चाचणी सिद्ध करण्यास अपयशी ठरली. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. त्यामुळे हा विजय राज्यातील अकरा कोटी जनतेचा आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
याचबरोबर, आज तिन्ही पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत गटनेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे जातील. तसेच, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचा होकार असल्याचेही यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0