दरमहा 5000 रुपये पेन्शन देणारी "अटल पेन्शन ", हि सरकारी योजना ‘या’ महिन्यात होणार बंद !

    दिनांक : 03-Sep-2022
Total Views |
जळगाव : मोदी सरकारकडून अटल पेन्शन योजना ही सरकारच्या लोकप्रिय पेन्शन योजनांपैकी एक आहे. आता या महिन्यापासून या योजनेत मोठा बदल होणार आहे. नवीन नियमांनुसार आता आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते.
 
 

atal pention yojana
 
 
 
 
हा नवा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. अशा परिस्थितीत करदात्यांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्याची संधी आहे. तुम्ही ३० सप्टेंबरपर्यंत करदाते असलो तरीही त्यात गुंतवणूक करू शकता. सध्याच्या नियमांनुसार, 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक सरकारच्या या पेन्शन योजनेत सामील होऊ शकतो, मग भलेही तो आयकर भरो या ना भरो.
 
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी
 
अटल पेन्शन योजना (APY) ही भारतातील नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे. हे मुळात असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी चालवले जाते. APY अंतर्गत, किमान पेन्शनची हमी आहे जी रु. 1,000, रु. 2,000, रु. 3,000, रु. 4,000 किंवा रु.5,000 पर्यंत दिले जाते. ग्राहक या खात्यात पैसे जमा करतात, त्यानुसार वयाच्या ६० व्या वर्षी पेन्शन मिळते.
 
4 कोटी लोक सामील 
 
ही योजना (APY) आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे जे इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाहीत. अवघ्या 6 वर्षात ही योजना 4 कोटी लोकांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 99 लाख लोक या योजनेत सामील झाले.
 
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनुसार, आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीस 4.01 कोटी लोक या योजनेत गुंतवणूक करत होते. मुदतपूर्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे गुंतवणुकीची रक्कम आणि तुमचे वय ठरवेल. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे चालविली जाते.