डोंबिवलीत धक्कादायक घटना ... रेल्वेची भिंत कोसळल्याने दोघांचा मृत्यू !

    दिनांक : 21-Sep-2022
Total Views |
डोंबविली: डोंबिवलीत रेल्वेची भिंत कोसळल्याने तीन कामगार जखमी तर दोघांचा मृत्यू झाला आहे. यातून रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पाश्चिमेतील कोपर परिसरात रेल्वेची भिंत बांधण्याचे काम सुरू होते. त्याच भिंतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन मजूर जखमी झाले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
 

accident 
 
 
 
 
डोंबिवलीच्या पश्चिमेत कोपर परिसरात रेल्वेची भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. डोंबिवलीच्या पश्चिमच्या कोपर परिसरात रेल्वेची भिंत बांधण्याचे काम चालू होते. त्याच भिंतीचा काही भाग कोसळला. यामध्ये तीन कामगार जखमी झाले आहेत. तर दोन मजूरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत बंडू कुवासे (वय ५०) आणि मल्लेश चव्हाण (वय ३५) यांचा मृत्यू झाला आहे. तर विनायक चौधरी (वय ३५), युवराज वेडगुत्तलवार (वय ३५), मानिक पवार (वय ६२) हे तिघे व्यक्ती या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.