युवासेनेकडून राज्यपालांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम
जळगाव : राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतून राजस्थानी व गुजराती लोक जर बाहेर गेले; तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य केले. या वक्तव्याच्या विरोधात महाराष्ट्रभर निषेध केला जात आहे. त्यानसार जळगावात देखील राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात युवासेना महानगरतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
युवासेनेकडून राज्यपालांच्या विरोधात जळगाव शहरातील काव्यरत्नवली चौक व नेहरू चौक येथे स्वाक्षरी मोहिम राबविली. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भगतसिंग कोश्यारी यांचा धिक्कार असो.., या राज्यपालाचं करायचा काय? खालती डोकं वरती पाय...अशी घोषणाबाजी युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून राज्यपाल भगतसिंग जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.