पावसाने तारले आता कृषी विभागाने मारू नये - खा.उन्मेश पाटील

    दिनांक : 12-Jul-2022
Total Views |
जळगाव : जिल्ह्यातील शेतकर्‍यांसोबत चर्चा करत असताना व प्राप्त होणार्‍या सूचनेनुसार शेतकर्‍यांना रासायनिक खतांच्या पुरवठा होतांना अनियमितता असून त्याबाबत तातडीने दखल घ्या. तसेच शेतकर्‍यांनी आपण लागवड केलेल्या पिकाचा पेरा ई-पीक पाहणीमध्ये लावल्यानंतर व नुकसान झाल्यानंतर सदरील पीक पेरा मधून न लावल्यास नुकसान भरपाई देय राहणार नाही असे संबंधित विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना सांगण्यात येत आहे. याबाबत शहानिशा करा. पावसाने तारले आता कृषी विभागाने मारू नये, अशी मागणी खा.उन्मेश पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.

MP Unmesh Patil 
 
खा.पाटील यांनी दुपारी चार वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनात संभाजी ठाकूर यांची भेट घेत सध्याच्या परिस्थितीत शेतकर्‍यांना येत असलेल्या अडचणीबाबत चर्चा केली. यावेळी कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उपसंचालक कुरबान तडवी, भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र चौधरी, माजी सरपंच रवींद्र पाटील, भरारी फाऊंडेशन अध्यक्ष दीपक परदेशी, मोहीम अधिकारी विजय पवार, पोखरा प्रकल्प समन्वयक संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
 
निवेदनात खा.पाटील यांनी म्हटले आहे की, रासायनिक खत (उदा.10:26:26 डी.ए.पी) स्थानिक बाजारपेठेमध्ये जादा दराने/लिंकिंगने घ्यावे लागत आहेत व काही ठिकाणी खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ जळगाव जिल्ह्यात असलेल्या खतांचा बफर स्टॉक रिलीज करण्याबाबत निवेदन देऊन चर्चा केली. त्याचप्रमाणे मागील वर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जळगाव जिल्हा मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, मका आदी पिकांकरिता शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली होती अंदाजे 200 कोटी रुपये कधी नव्हती एवढी नुकसान भरपाई रक्कम सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने मंजूर झाली होती.
 
यावर्षी देखील सदरील योजनेत शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला असून ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत उदा. शेतकर्‍यांनी आपण लागवड केलेल्या पिकाचा पेरा ई पिक पाहणी यामध्ये लावल्यानंतर व नुकसान झाल्यानंतर सदरील पीक पेरा प मधून न लावल्यास नुकसान भरपाई देय राहणार नाही असे संबंधित विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना सांगण्यात येत आहे परंतु याबाबत प्रत्यक्ष ज्या काही तांत्रिक अडचणी येतात जसे शेतकर्‍यांना संबंधित याबाबत पुरेशी माहिती नसणे, काही शेतकर्‍यांना अँड्रॉइड मोबाईल हाताळणी शक्य होत नाही आदी अडचणी लक्षात घेऊन सदरील विषयाची सक्ती न करता महाशय तलाठी यांनी लावलेले पीक पेरे देखील ग्राह्य धरावे, अशा मागणीचे निवेदन दिले.