दोन वर्षांनंतर वाजली शाळेची घंटा

    दिनांक : 30-Jun-2022
Total Views |

वेध


दोन वर्षांपासून Teaching ओस पडलेली शाळा बुधवारी सजली होती. मुलांचा किलबिलाट, शिक्षकांचा उत्साह आणि शाळा व्यवस्थापनासह पालकांच्या चेहर्‍यावरील आनंद सर्वत्र दिसत होता.

 
 
 
shala

 

 
 
 
 
शिक्षक व शाळा व्यवस्थापनाने चिमुकल्यांचे कुठे औक्षवण करून तर कुठे फुलांच्या वर्षावाने स्वागत केले. विदर्भात सर्वत्रच शाळा प्रवेशाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. दोन वर्षांनंतर शाळेची घंटा वाजली. कोरोना प्रादुर्भावामुळे जग ठप्प झाले होते. कोरोना ओसरला. आता सर्व ठीक होईल, असे वाटत असतानाच दुसर्‍या, तिसर्‍या लाटेने पुन्हा भय निर्माण केेले. पण आता मात्र मोकळा श्वास घेता येईल, अशी परिस्थिती आहे. तब्बल दोन वर्षांनंतर व्यवहार आणि जगणं सुरळीत होत आहे. मुलांच्या शाळा पूर्ण क्षमतेने आणि मोकळिकीत सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या आपत्तीमुळे अनेक बदलांना सामोरे जावं लागतं आहे. पूर्ण क्षमतेने आणि मोकळिकीत Teaching Start शाळा सुरू झाल्याचा आनंद असतानाच काही प्रश्नांची व्यक्तिगत स्तरावर तर काही प्रश्नांची सार्वजनिक स्तरावर सोडवणूक करावी लागणार आहे. दोन वर्षे शाळा बंद असल्याने शिस्त, नियम, धाक, अभ्यास या बाबींचा विसर विद्यार्थ्यांना पडला असण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी पूर्व प्राथमिकमध्ये प्रवेशणारा विद्यार्थी आता मात्र थेट प्राथमिक वर्गात प्रवेश घेणार आहे. या कालावधीत अक्षर ओळखीपासून ते शाळेतील मित्रांच्या ओळखीपर्यंत होणारा प्रवास, आई-वडिलांच्या अनुपस्थितीत कसं वागायचं हा नकळत पण व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी आवश्यक असणारा संस्कार यापासून हा विद्यार्थी अनभिज्ञ आहे. त्यामुळे हा विद्यार्थी शाळेत रुळण्याकरिता विशेष प्रयत्न आणि उपक्रमांची गरज आहे.
 

दोन वर्षे ग्रामीण भागात काही ठिकाणी Teaching शिक्षण बंद होते तर शहरी भागांसह काही ठिकाणी आभासी शिक्षण दिले जात होते. ज्या ठिकाणी शिक्षणच बंद होते तेथील मुलांच्या आणि ज्या ठिकाणी आभासी Teaching Start शिक्षण सुरू होते, त्या मुलांच्या समस्या भिन्न असणार आहेत. या समस्यांच्या निराकरणासाठीचेही चिंतन पालकांसह शिक्षक व शाळा व्यवस्थापनाला करावे लागेल. शिक्षण हे आभासी असते. असाच समज चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजला असण्याचीही शक्यता आहे. आभासी पद्धतीत शिकतानाचे जे दोष आहेत त्या दोषांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारा गुंता हळुवार सोडवावा लागेल. आता कोरोना संकटानंतर 'नवा गडी नवा राज' या न्यायाने शाळा सुरू झाल्या आहेत. हे खरे असले तरी पुन्हा जुनी घडी नव्याने बसविण्यासाठी आणि शिक्षणाचा जुना ओघ पूर्ववत् व्हावा यासाठी सर्वच घटकांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्याने व कोणाकडे जाताही येत नसल्याने विद्यार्थ्यांना मित्र नव्हतेच; परिणामी त्यांचा एकाकीपणा वाढला. आता नव्याने पुन्हा मित्र मिळणार असल्याने हा एकाकीपणा घालविण्याची कसरत करावी लागणार आहे. कोरोना काळात आभासी शिक्षणामुळे शिक्षकांशिवायही आपण उत्तीर्ण होऊ शकतो, ही विद्यार्थ्यांची भावना असू शकते. या भावनेने कदाचित शिक्षकांबद्दल पूर्वी असलेला आदर कमी होऊ शकतो. ही नवी भीती निर्माण झाली आहे. यावरही शाळांना मात करावी लागेल व प्रत्यक्ष Teaching शिक्षण हेच महत्त्वाचे आहे, हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवावे लागणार आहे व तेही त्यांच्या कलाकलाने. कोरोना काळात जसे अनेक विद्यार्थी पूर्ण अभ्यासक्रमाला मुकले तसेच अनेक शिक्षकही अभ्यासक्रमाच्या जबाबदारीतून मुक्त होते. आता पूर्ण शाळा सुरू झाल्या असल्याने या शैक्षणिक वर्षात तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना नव्या नेटाने प्रयत्न करावे लागतील; शिवाय विद्यार्थ्यांनाही तशी मेहनत घ्यावी लागेल. कारण, दोन वर्षांची शिथिलता भरून काढणे व पूर्वीची मानसिकता निर्माण करणे, हे आव्हानच आहे. प्रत्यक्ष शाळेत शिकविणे आणि आभासी शिकविणे यात अंतर असून कोरोनामुळे शिक्षकांचाही शिकविण्याचा सराव कमी झाला आहे. अशी सर्व आव्हाने शाळेत शिकणारी मुले, त्यांचे पालक, शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि या सर्वांसाठी नियोजन करणारे सरकार यांच्यासमोर आहेत. ही सर्व प्रक्रिया सहजतेने कशी होईल, याचा विचार व्हावयास हवा. शिवाय कोरोना काळातील परीक्षा सर्वांना उत्तीर्ण करणार्‍या झाल्या. त्यामुळे त्यांचा तसा दर्जा नव्हता. पण आता परीक्षा पूर्ण नियमाने होणार असल्याने त्यांचा दर्जाही राखण्याचे आव्हान Teaching शिक्षण विभागापुढे आहे.

 
- नीलेश जोशी
 

- 9422862484