आयान कारखान्याच्या आगीत ११ कोटींचे नुकसान

    दिनांक : 07-May-2022
Total Views |
नंदुरबार : तालुक्यातील समशेरपुर येथील आयान साखर कारखान्यातील मळीला लागलेल्या आगीत सुमारे अकरा कोटीचे नुकसान झाले. ७ रोजी सकाळी ही आग लागली. ही आग आटोक्यात आली असून कुठल्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनातर्फे देण्यात आली. समशेरपुर येथील आयान मल्टीट्रेड एल.पी.युनिट या साखर कारखान्यात साखर उत्पादन होत आहे. वाढलेल्या उष्णता तापमानामुळे टाकीतील मळी जळून खाक झाली.

 
 fire fact
 
 
साखर कारखान्याच्या टाकीतील मळीने उष्ण तापमानामुळे आज सकाळी पेट घेतला. मळी ज्वलनशील पदार्थ असल्याने वाढलेल्या उष्णतेमुळे त्याने पेट घेतात. त्यामुळे टाकीतील ९८०५.४०० मेट्रिक टन मळी जळाली. मळी जळाल्याने कारखान्याचे सुमारे दहा ते अकरा कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले. ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.