भारतीय रेल्वेवर दशतवादी हल्ल्याचं सावट आहे., गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट

    दिनांक : 23-May-2022
Total Views |
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अहवालात दिली आहे. आयएसआयनं रेल्वेवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचला आहे. आयएसआयचा घातपाती कारवायांचा हा कट उघड झाला आहे. यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
 
 

rel
 
 
 
गुप्तहेर यंत्रणांनी या संदर्भात अलर्ट जारी केला आहे . पंजाब आणि इतर आसपासच्या राज्यात रेल्वे गाड्या, रेल्वे स्टेशन्स, रेल्वे ट्रॅक यांना दहशतवाद्यांकडून मोठा धोका असल्याचा अलर्ट देण्यात आला आहे . आयएसआयने यासाठी स्थानिक हस्तकांना मोठ्या प्रमाणात फंडींग केलंय. भारतातल्या आयएसआयच्या स्लीपर सेल्स अॅक्टिव्ह झाल्या आहेत.
 
गर्दीची ठिकाणं ही नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिली आहे. मुंबईवर देखील अनेकदा दहशतवादी हल्ले झाले. मुंबईच्या लोकल या नेहमीच गर्दीचं भरलेल्या असतात. त्यामुळे मुंबईवर देखील नेहमी दहशतवादी हल्ल्याचं सावट असतं.
 
भारतीय रेल्वे याआधी ही दशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली आहे. 2006 मध्ये मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. 11 जुलै 2006 रोजी मुंबईत संध्याकाळी 6.23 वाजून 11 मिनिटांच्या आत पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या सात बोगींमध्ये सात सीरियल बॉम्बचा स्फोट झाला होता. ज्यामध्ये 189 प्रवासी ठार झाले होते तर 817 जण जखमी झाले होते. माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, खार रोड, जोगेश्वरी, बोरिवली आणि मीरा रोड स्थानकावर हे सात मालिका बॉम्बस्फोट झाले होते.