वृक्षांना राखी बांधून होणार रक्षाबंधन साजरे

    दिनांक : 01-Aug-2020
Total Views |
भारतीय सिंधू सभेचा अनोखा उपक्रम
 
rakhi_1  H x W:
 
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रक्षाबंधनासाठी प्रत्येक महिलेला आपल्या माहेरी जाणे शक्य नाही. त्यामुळे भारतीय सिंधू सभेतर्फे वृक्षारोपण करुन आणि त्याला भाऊ मानून राखी बांधून सण साजरा करावा. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने प्रत्येकाला घरात राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे घरात राहून आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय अध्यक्षा माया कोठनानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत आहे.
 
सिंधू सभेच्या महाराष्ट्रातील ३० शाखांतर्फे हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात समाजातील सहभागी महिलांनी २ ऑगस्टपर्यंत वृक्षास बांधलेल्या राखीचा सेल्फी काढून ८८४९७४६७२८ व ९४२०३४७६४९ या व्हॉटसऍप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन भारतीय सिंधू सभेच्या प्रांत अध्यक्षा रितु रायसिंघानी, प्रांत सचिव रेश्मा बहेरानी, राष्ट्रीय अध्यक्षा माया कोडनानी यांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीससुद्धा देण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल.