संसर्ग थांबेना ः जिल्ह्यात २६७ रूग्णांची वाढ

    दिनांक : 30-Jul-2020
Total Views |
दिवसभरात २७१ कोरोनामुक्त, १३ रुग्णांचा मृत्यू

 
Corona_1  H x W
 
जळगाव, ३० जुलै
जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार गुरुवारी जिल्ह्यातील २६७ जणांना कोरोनाची बाधा झाला. तर दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात तब्बल २७१ रूग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आढळून आलेल्या अहवालात जळगाव शहरासह जामनेर व चाळीसगावात संसर्ग पुन्हा वाढत आहे.
 
 
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायमच असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यासोबत आता बरे होणार्‍या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात २६७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. तर दिवसभरात १३ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
असे आहेत नवे रुग्ण
जळगाव शहरात ८६ नवे रूग्ण आढळले असून जामनेर ३४, चाळीसगाव २८, जळगाव ग्रामीण २३, भुसावळ ८, अमळनेर ४, चोपडा १६, भडगाव ७, धरणगाव ९, यावल १२, एरंडोल ५, रावेर २, पारोळा १५ असू एकूण २६७ रूग्ण आढळून आले आहे.
 
तालुकानिहाय एकूण रूग्णसंख्या
जळगाव शहर २७७८ व ग्रामीण ५१५, भुसावळ ८७८, अमळनेर ६९३, चोपडा ७४१, पाचोरा ३९१, भडगाव ४१९, धरणगाव ४९०, यावल ४६१, एरंडोल ५०२, जामनेर ७४९, रावेर ६८५, पारोळा ४७०, चाळीसगाव ४७३, मुक्ताईनगर ३३३, बोदवड २३९, इतर जिल्हे ४१ असे एकूण १० हजार ८५८ रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ७ हजार २८७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. बाधितांपैकी ३ हजार ६५ रूग्ण उपचार घेत असून आजपर्यंत ५०६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.