तळोदा : येथील विठ्ठल मंदिर परिसरात आयुष्य मंत्रालयाने निर्धारित केलेल्या काढ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे १५०० नागरिकांना वाटप करण्यात आले. कोविड १९ या आजारावर रोगप्रतिकारक शक्ती वाढावी ह्या हेतूने काढ्याच वाटप करतांना त्याच महत्व पटवून देण्यात आले.
देशाला ज्या ज्या वेळी संकटाचा सामना करावा लागतो त्या त्या वेळी देश हमे देता है सबकुछ हम भी तो कुछ देना सीखे ह्या ओळीं प्रमाणे आपल्या परीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाच्या मदतीसाठी धावून आल्याच आपण अनेकदा पाहत असतो. कोरोनाच्या काळात ही अनेक ठिकाणी संघाच्या स्वयंसेवकांचे स्तुत्य उपक्रम आपण पाहतच आहोत. जनसेवा हीच ईश्वर सेवा असे म्हणत तळोदेकरांनी संघाच्या स्तुत्य उपक्रमाच स्वागत करून आभार मानले.