वीज बिल माफ करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार
वरणगाव : शहरात व परिसरात कोरोना या महामारीत सर्वसामान्य नागरिकांना वाढीव वीजबिल आलेले आहे. सर्व सामान्य नागरिकांना २० हजारांहून अधिक वाढीव वीज बिले आल्याने नागरिक प्रचंड हैराण झालेले आहेत. वाढीव वीज बिल माफ करावे तसेच जनहिताच्या समस्या घेऊन आज वरणगाव येथे वीजमंडळाच्या कार्यलयासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली.
याप्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा नेते सुनील माळी, हाजी अल्लउद्दीन सेठ, शामराव धनगर, रमेश पालवे, हितेश चौधरी, विवेक शिवरामे, शंकर पवार, संजय सोनार, डी.के.खाटीक, गोलू राणे, नटराज चौधरी, आकाश निमकर, किरण वंजारी, अतुल बावणे, राहूल जंजाळे, अनिकेत चांदखेडकर, राकेश लोहार, जय चांदणे, अनिल कुसूमंबे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की वरणगाव शरातील परिसरातील नागरिकांचे आलेले वाढीव वीज बिल माफ करावे , वारंवार अवेळी शहरात वीज खंडित केली जाते. वीज सुरळीत करण्यात यावी. वीज मंडळ कार्यलयात फोनवर कायम कर्मचार्याची नियुक्ती करण्यात यावी ,तसेच रेल्वे स्टेशन ते बस स्टँड चौक दरम्यान डीपीडीसी अंतर्गत ३५ लाख रुपयांचे वीज पोल शिफ्टींगचे काम मंजूर झालेले आहे. ते वीज पोल शिफ्टींग करण्यात यावे. शेतक़र्यांच्या शेतात वीज तार कापून चोर नेत आहेत. त्यावर वीज तार नवीन टाकण्यात यावे. नागेशवर ते पाणी पुरवठा योजन पर्यत डीपीडीसीतून वीजपोल टाकलेले आहे. ते काढू नये आणि बंद केलेला वीज पुरवठा सुरु करण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा नगराध्यक्ष सुनील काळे व शामराव धनगर यांनी दिला.