भाजपातर्फे तहसीलदारांना निवेदन
तळोदा : शेतकर्यांचे कर्ज माफ करून त्यांना पीक कर्ज द्यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे बँकांसमोर निदर्शने केली. तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा सुरू झाला तरी पीक कर्ज वाटप ठप्प आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना घोषित केल्याप्रमाणे ५० हजार रक्कम मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबात तहसीलदार पंकज लोखंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आ. राजेश पाडवी, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत, आनंद सोनार, नगरसेवक हेमलाल मगरे, नगरपालिकेचे सभापती रामानंद ठाकरे, शिरीष माळी, योगेश चव्हाण आदी उपस्थित होते.