7 वर्षानंतर श्रीसंत पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर

    दिनांक : 20-Jun-2020
Total Views |
 
 
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळलेला भारतीय वेगवान गोलंदाज एस श्रीसंतला बीसीसीआयने दिलासा दिल्यानंतर आता सात वर्षानंतर तो क्रिकेट खेळताना दिसू शकतो. केरळ क्रिकेट असोसिएशनने रणजी संघात त्याची निवड केली आहे. श्रीसंत भारताच्या 2007 टी-20 आणि 2011 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य होता. 2013 च्या आयपीएल स्पर्धेत तो स्पॉट फिक्सिंगमध्ये असल्याचे दिसताच त्याच्यावर मंडळाने कायमची बंदी घालून त्याला क्रिकेटपासून दूर केले होते. याविरूध्द त्याने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2018 मध्ये केरळ उच्च न्यायालयात निकाल विरूध्द गेल्याने तो सर्वोच्च न्यायालयात गेला होता. तेथे श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर 3 महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिले होते. त्यानंतर लोकपाल डी. के. जैन हे श्रीसंतबद्दल निर्णय घेतील असा निर्णय भारतीय बोर्डाने घेतला होता.
 
 
SHREESANT_1  H
 
 
आता त्या निर्णयानुसार श्रीसंतचा क्रिकेटच्या मैदानावर येण्याचा मार्ग सुकर झाला आहे. श्रीसंत म्हणतो, संधी दिल्याबद्दल केसीएचा खरोखर आभारी आहे. सर्व वाद मिटवण्याची वेळ आली आहे. 27 कसोटी, 53 वनडे आणि 10 टी-20 सामने खेळणारा श्रीसंत अखेरचा सामना ऑगस्ट 2011 मध्ये खेळला होता. कोविड-19 नंतर मैदानावरील प्रशिक्षणानंतरच श्रीशांतच्या फिटनेसचे मूल्यांकन करता येईल यावर जोर देऊन केरळचे प्रशिक्षक टीनू योहानन म्हणाले की केसीए त्याचे संघात स्वागत करण्यास तयार आहे.श्रीसंतला 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक करून त्याला आजीवन बंदीसह 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आजीवन बंदी घालण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे श्रीसंतने म्हटले होते. ज्यानंतर 2019 मध्ये आपण पोलिसांच्या भीतीने गुन्हा कबूल केल्याचा दावा श्रीसंतने केला होता.