जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८८ टक्क्यांवर

    दिनांक : 03-Oct-2020
Total Views |
जिल्ह्यात २९८ नवे रुग्ण तर ८०५ रुग्ण कोरोनामुक्त; ७ जणांचा मृत्यू
 
dfnk_1  H x W:
 
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याच्या प्रमाणाला गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. बरे होणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. शनिवारी दिवसभरात २९८ नवे रुग्ण आढळून आले असून ८०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा ८७.८७ टक्क्यांवर आला असल्याने ही जळगावकरांसाठी समाधानाची बाब ठरत आहे.
 
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याचे सर्वांच्या चिंतेत भर पडली होती. परंंतु गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांचा आकडा काही प्रमाणात मंदावला असून बाधितांपेक्षा पेक्षा बरे होणार्‍यांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे २९८ नवे रूग्ण आढळून आले तर ८०५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच आतापर्यंत बाधितांची संख्या ही ४९ हजार १०५ इतकी तर त्यापैकी ४३ हजार १४८ जण बरे झाली असून १ हजार १९८ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४ हजार ७५८ जणांवर सध्य उपचार सुरु आहे.
 
असे आढळले रुग्ण
शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात २९८ नवे रुग्ण आढळले. यामध्ये जळगाव शहर ७६, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ २२, अमळनेर ६, चोपडा २५, पाचोरा ७, भडगाव २, धरणगाव ७, यावल ८, एरंडोल १, जामनेर ४, रावेर ७, पारोळा ३, चाळीसगाव ७, मुक्ताईनगर १०४, बोदवड ५ तर इतर जिल्ह्यातील ३ जणांचा समावेश आहे. शनिवारी दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये जळगाव शहरातील २ तर भुसावळ, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव व मुक्ताईनगर याठिकाणावरील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
 
मुक्ताईनगरात आज शंभरीपार
जिल्ह्यातील बाधितांचा आकडा कमी होत आहे. मात्र शनिवारी मुक्ताईनगर तालुक्यात बाधितांनी शंभरीपार केली असून याठिकाणी १०४ नवे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.