नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर

    दिनांक : 09-Dec-2019
नवी दिल्ली: बहुचर्चित व विवादित नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी सादर केले. विधेयक सादर झाल्यानंतर विरोधी पक्षाकडून त्यास मोठा विरोध करण्यात आला. तथापि गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयक संबंधी उठवलेल्या प्रश्नांचे सविस्तर उत्तर दिले. २०१६ मध्ये सुधा हे विधेयक सादर करण्यात आले होते, परंतु राज्यसभेत ते पारित होऊ शकले नव्हते.

a_1  H x W: 0 x 
 
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संविधानाच्या कोणत्याही कलमास धक्का पोहचवत नाही. तसेच हे विधेयक मुस्लिम समाजाच्या विरोधातही नाही. या विधेयकामुळे केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश मधील छळ होणाऱ्या अल्पसंख्याक समुदायाला भारतात नागरिकत्व देण्यासंबंधी निर्णय होणार आहे. तसेच आम्ही नागरिकत्व संबंधी घेतलेला निर्णय ही काही पहिलीच वेळ नाही. असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
 
विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अमित शाह म्हणाले, या अगोदर १९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांग्लादेश मधून आलेल्या सर्व नागरिकांना नागरिकत्व बहाल केले होते. त्यावेळी पाकिस्तानामधून आलेल्या नागरिकांना का नागरिकत्व दिले नाही? संविधानाच्या कलम १४ ला धक्का पोहचला नव्हता का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस शासनात युगांडा येथून येणाऱ्या नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. दंडकारण्य प्रकरणात ही काँग्रेसने असाच निर्णय केलेला आहे. समानतेच्या विषयावर बोलयाचेच असेल तर मुस्लिमांना विशेष अधिकार का? असा सवालही त्यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर विरोधकांनी मोठा गोंधळ घातला.
 
नागरिकत्व अधिनियम १९५५ मध्ये काँग्रेसने पारित केले होते. ज्यामध्ये भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी ११ वर्ष भारतात राहिवासाची अट घालण्यात आली होती. नवीन विधेयकामुळे ही अट ११ वर्षावरून ६ वर्षापर्यंत कमी करण्यात आली आहे. ज्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश येथून आलेल्या हिंदू, इसाई, बौद्ध, शीख, पारशी समुदायाचा समावेश करण्यात आला आहे.
 
मुस्लिम समुदायाचा यात समावेश का नाही? यावर जोळताना शाह म्हणाले की या तीन देशातून मुस्लिम समाज धार्मिक छळास बाली पडत नाही. ज्या समुदायाना या देशांमध्ये धार्मिक छळास सामोरे जावे लागते त्यांचा माही समावेश केला आहे. परंतु जर असे कुणी मुस्लिम बांधव या कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा दावा करतील त्यांच्या मताचा विचार केला जाईल असे अमित शहांनी स्पष्ट केले.