जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली

    दिनांक : 26-Nov-2019
 
जळगाव: " २६ नोव्हेंबर २००८ " चा मुंबईवरील दशशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० दहशतवादयांनी केलेला एक भिषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्लयात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण मृत्युमुखी, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. मुंबईच्या इतिहासातील महाभंयकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ०९ दशहतवादयांना ठार केले व उर्वरित एकास जिवंत पकडुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते.
 

 
 
 
 
पोलीस अधीक्षक डॉ.श्री.पंजाबराव उगले यांनी आज सकाळी ११:०० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातील आवारात जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे २६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लयातील शहीदांना श्रध्दाजंली अर्पण केली. सदर प्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ.श्री.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती.भाग्यश्री नवटके, पो.नि.श्री.डी.एम.पाटील,रा.पो.नि.श्री.सुभाष कावरे, कार्यालय अधिक्षक श्री.विलास पवार , सपोनि.श्री.राजेश शिंदे, सपोनि.श्री.सिध्देश्वर आखेगावकर इत्यादी पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
 
तसेच संविधान दिवस निमित्ताने पोलीस अधीक्षक डॉ.श्री.पंजाबराव उगले यांचे सह सर्व उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.