राजकीय भूकंप... मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीसच !

    दिनांक : 23-Nov-2019
राजकीय भूकंप... मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीसच ! 
 
 
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचविणारी घटना आज भल्या पाहते घडली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. काल पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे सरकार स्थापन होणार असे चित्र निर्माण झाले असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे.
 


 
 
 
देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळे राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे. अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्यात शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे. तीन्ही पक्षांच्या बैठकांचे सत्र काही संपत नव्हते. यामुळे आम्ही भाजपासोबत दोन पक्षांचे सरकार स्थापने करायचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले.